Ad will apear here
Next
शरद पवारांची स्मार्ट खेळी; भाजपने चर्चेला यावे?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी मुंबईतील मेळाव्यात भाजपसोबतची युती तोडत आगामी काळात राज्यभरात एकट्याने भगवा फडकवणार असल्याची गर्जना केली. उद्धव यांच्या या घोषणेनंतर प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता, इतके वर्ष एकत्र असणारे पक्ष वेगळे झाले, या गोष्टीचे अतीव दु:ख झाल्याचे म्हटले. विशेष म्हणजे यावेळी पवारांच्या चेहऱ्यावर मिष्किल हसू होते. त्यानंतर शिवसेनेने राज्य सरकारचा पाठिंबा काढल्यास राष्ट्रवादी सरकारला मदत करणार का, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. यावर मी जर तरच्या प्रश्नांची उत्तरे देत नाही. मात्र, एकदा निर्णय झाला की चर्चेला यावे, असे सांगत पवारांनी भाजपसाठी आपली दारे उघडी असल्याचे संकेत दिले. त्यामुळे आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीनंतरची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपने शेवटच्या क्षणी शिवसेनेसोबतची युती तोडली होती. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. या अनपेक्षित धक्क्यातून सावरण्यास वेळ लागल्यामुळे या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत सेनेवर सरशी साधली होती. मात्र, भाजप विधानसभेत बहुमत प्राप्त करु शकली नव्हती. त्यामुळे सत्ता स्थापनेच्यावेळी शिवसेना काही मुद्द्यांवरून अडून बसली होती. मात्र, त्यावेळीदेखील पवार यांनी अनपेक्षितपणे भाजपला पाठिंबा असल्याचे जाहीर करत शिवसेनेची किंमत शून्य करून टाकली होती. त्यामुळे विधानसभेत प्रत्यक्ष बहुमत सिद्ध करण्याच्यादिवशी सेनेला नाईलाजाने भाजपला पाठिंबा द्यावा लागला होता. मात्र, आता अडीच वर्षांच्या काळात परिस्थिती मोठ्याप्रमाणावर बदलली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या काही निर्णयांमुळे जनतेमध्ये नाराजी आहे. त्यामुळे आता भाजप पवारांच्या या प्रस्तावाला कशाप्रकारे प्रतिसाद देणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WXEIAY
Similar Posts
रिपब्लिकनला २५ जागा; भाजप-मित्रपक्षांतील जागावाटपाचा तिढा सुटला! मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप आणि मित्रपक्ष एकत्र आले आहेत. भाजपने मित्रपक्षांसाठी ३४ जागा सोडल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत जागावाटपावरून भाजप आणि मित्रपक्षांमध्ये निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. भाजप १९५ जागांवर लढणार असून मित्रपक्षांसाठी ३४ जागा सोडण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष
शिवसेनेची सावध पावलं, महापौरपदासाठी गट स्थापन.. मुंबई महापालिकेत महापौर कुणाचा? या प्रश्नाचं उत्तर अद्याप कुणाकडेच नाही. मात्र शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि शिवसेनेला समर्थन दिलेले अपक्ष नगरसेवक आज कोकण भवनावर जाऊन गट स्थापन करणार आहेत. महापौर निवडीच्या दिवशी दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेनं हे पाऊल उचललं आहे. शिवसेना आणि भाजप
महापालिकेतील घोटाळ्यांची पोलखोल करणार - किरीट सोमय्या मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांवरुन सातत्याने शिवसेनेला कोंडीत पकडणाऱ्या भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी घोटाळ्यांची ‘काळी पत्रिका’ जाहीर करण्याची घोषणा केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची युती तुटल्याचे जाहीर केल्यानंतर आता भाजपने शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे
भारतीय जनता पक्षावर सडेतोड हल्लाबोल-राज ठाकरे भारतीय जनता पक्षाची सत्ता मुंबईत नको, म्हणून शिवसेनेसोबत युतीसाठी प्रयत्न केला, पण मातोश्रीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही असे सांगून आता मराठी माणसांनी एकत्र येऊन थापा मारणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. "थापा म्हणजेच भाजपा' अशा शब्दांत राज यांनी टीका केली. 

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language